कविता 

मी काय विसरलो . . . ?

🙆 मी काय विसरलो ?? 🙆

घरात टी वी आला,
मी वाचन विसरलो।

दारात गाडी आली,
मी चालणे विसरलो|

हातात मोबाईल आला,
मी पत्रलेखन विसरलो!

कॅलक्युलेटर वापरामुळे,
पाढेच म्हणणे विसरलो।

एसी च्या संगतीने,
झाडाखालचा गारवा विसरलो।

शहरात राहील्यामुळे,
मातीचा वास विसरलो।

बँकखाती संभाळताना,
पैशाची किंमत विसरलो।

बिभत्स चित्रामुळे,
सौंदर्य पहाणे विसरलो।

कृत्रिम सेंटच्या वासाने,
फ़ुलांचा सुगंध विसरलो।

फ़ास्ट फ़ूडच्या जमान्यात,
तृप्तीची ढेकर विसरलो।

स्वार्थी नाती जपल्यामुळे,
खरे प्रेम करणे विसरलो।

क्षणीक सुखाच्या लोभात,
सत्कर्मातला आनंद विसरलो।

सतत धावत असताना,
क्षणभर थांबणं विसरलो।

WhatsApp आल्यापासून,
सुखाने झोपणेही विसरलो !!!!!

✳आयुष्य✳

संग्रहित:-
श्री देविदास पांचाळ सर
श्री तुळजभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर

Related posts