आपल्याला जंगलं, पाणी किंवा इतर विषयांपेक्षा महत्त्वाचं काय? औरंगजेबाची कबर हटवायची, आत्ता कुठून आला हा विषय? चित्रपटाने जागे होणारे हिंदू काहीही कामाचे नाही. चित्रपट उतरला की हे उतरले. विकी कौशल मेल्यावर आणि अक्षय खन्ना औरंगजेब बनून आल्यावर तुम्हाला औरंगजेब कळला का? व्हॉट्स अॅपवर इतिहास नाही वाचता येत. इतिहास वाचण्यासाठी तुम्हाला पुस्तकं वाचावी लागतील. औरंगजेबावर कुणीही बोलत आहेत. विधानसभेत बोलत आहेत. औरंगजेबाचा जन्म गुजरातमधला आहे. त्याच्याबद्दल माहिती आहे का? इतिहासातून डोकं फिरवायला आहेच. ब्राह्मणांनी औरंगजेबाला साथ दिली वगैरे सांगितलं जातं, मराठ्यांनी साथ दिली. हे सगळं माथी भडकवण्यासाठी केलं जातं आहे. कसला इतिहास सांगतो आहोत ? इतिहासांच्या पानात गेलात ना तर अपेक्षांची भांडी ठळाठळ फुटतील. असंही राज ठाकरे म्हणाले.
previous post
next post