महाराष्ट्र

बीडच्या शेतकरी पुत्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना सभेआधी 6 प्रश्न

राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 27 ऑगस्ट रोजी बीडमध्ये सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पुत्राने अजित पवारांसमोर 6 प्रश्न उपस्थित केलेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनरच्या माध्यमातून हे 6 प्रश्न विचारले आहेत. सध्या हे बॅनर चर्चेचा विषय बनले आहे.

शेतकरी पुत्राने काय प्रश्न विचारले?
बारामतीप्रमाणे बीड जिल्हा जलसमृद्ध कधी होणार?

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2020 चा पिक विमा मिळाला, आमच्या शेतकऱ्यांना कधी ?

गेल्या वर्षीचे अनुदान वाटप कधी?

जिल्ह्यांच्या शैक्षणिक विकासासाठी एखादे विद्यापीठ कधी ?

कामगारांना प्रमाणपत्र आणि पाल्यांना शिष्यवृत्ती कधी ?

बारामतीचे रस्ते चकाचक झाले बीडचे खड्डे भरणार कधी ?

Related posts