उमरगा उस्मानाबाद  कळंब तुळजापूर परंडा बार्शी भूम लातूर

धाराशिव लोकसभा मतदारसंघातील वंचित शेतकऱ्यांना पीकविम्याची मदत मिळण्याचा मार्ग खुला – खा. ओमराजे निंबाळकर.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यासह लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा तालुका तसेच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांना पीकविम्याची मदत मिळण्याचा मार्ग खुला. कृषी व महसूल विभागाचे पंचनामे ग्राह्य धरून नुकसानभरपाई देण्याचे विमा कंपन्यांना शासनाचे निर्देश दिले असल्याची माहिती धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभेचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली.

उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातील धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हासह, औसा, निलंगा जि.लातुर व बार्शी जि.सोलापूर जिल्ह्यात जुलै-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे. सन 2020 या वर्षी जिल्ह्यातील 14 लाख 53 हजार 540 शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा हप्ता पोटी शेतकरी, राज्यशासन व केंद्र शासनाने मिळुन 1112 कोटी प्रीमियम भरला होता. जुलै-ऑक्टोबर या काळात जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टरवरील क्षेत्र पाण्यात वाहून गेले. या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील वीजेची व्यवस्था कोलमडली त्यामुळे या शेती क्षेत्राची माहिती, वीज नसल्याने, स्मार्टफोन व इंटरनेट सुविधा बंद पडल्यामुळे लाखो शेतकरी ऑनलाईन तक्रारी विमा पोर्टलवर नोंदवू शकले नव्हते.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सन-2021-22 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शून्य प्रहाराच्या माध्यमातून चर्चेत भाग घेऊन केंद्र सरकारच्या निदर्शनास आणुन दिले होते. तसेच कळंब- उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे आ.कैलास घाडगे-पाटील यांनी सन-2021-22 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न क्र.23957 च्या माध्यमातून प्रश्न उपस्थितीत करून कृषी व महसूल विभागाचे पंचनामे ग्राह्य धरून नुकसानभरपाई देण्याचे विमा कंपन्यांना विमा देण्यास निर्देश देण्यात यावी अशी मागणी केली होती.

त्याअनुषंगाने दि. 05 मार्च 2021 रोजी कृषी व महसूल विभागाचे पंचनामे ग्राह्य धरून नुकसानभरपाई देण्याचे विमा कंपन्यांना शासनाचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभा मतदारसंघातील वंचित शेतकऱ्यांना पीकविम्याची मदत मिळण्याचा मार्ग खुला झाला असल्याचे यावेळी खा. ओमराजे निंबाळकर आ. कैलास पाटील यांनी सांगितले.

जनतेसाठी केलेल्या सततच्या पाठपुराव्याने च शासनाचे निर्देश दिले गेले असल्याने, खा. ओमराजे निंबाळकर व आ.कैलास पाटील या शिवसेनेच्या आमदार व खासदार यांच्या जोडीचे कौतुक सर्वत्र केले जात आहे.

Related posts