उस्मानाबाद  महाराष्ट्र

प्रभागाच्या प्रलंबित मागण्यांना हळूहळू पूर्णत्वाचे स्वरूप

‘युवक प्रलंबित विकासकामांसाठी आक्रमक’
पुरुषोत्तम विष्णु बेले
उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी
उस्मानाबाद – प्रभाग १६ मधील अनेक कामे ही वर्षानुवर्षे पूर्ण होत नाहीत, त्यामुळे येथील सर्वच रहिवाशी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.यामध्ये अगदी मूलभूत सोयी सुविधा जसे की रस्ते व नाली यांची देखील कोणतीच सोय नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक वेळा महिला व जेष्ठ नागरिकांनी नगरपरिषदेमध्ये जाऊन याबाबत प्रश्न उपस्थित केला, पण समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे तेही हतबल झाले.त्यामुळे येथील युवा कार्यकर्त्यांनी हा प्रश्न उचलून धरत सतत वेळोवेळी पाठपुरावा केला, त्यात हद्दवाढ भागातील ओम नगरच्या प्रलंबित व मूलभूत विकास कामांना हात घातला. नाली व रस्ते कोणत्याही प्रकारे व्यवस्थित नसल्याचे सांगितले, सुशीला नगर व जवाहर कॉलनी भागातील रहिवाशांची दयनीय अवस्था युवकांनी सतत नगरपरिषद व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उचलून धरली, गणेश नगर मधील दक्षिण भागातील प्रलंबित रस्ते व नाल्यांची कामे कधी होणार? याची उत्तरे सतत प्रशासनाला मागितली. सध्याच्या येणाऱ्या पुढील कामांच्या यादीमध्ये ही कामे पूर्णत्वास लागण्याची शक्यता नागरिकांच्या वतीने सांगितली जात आहे. कारण वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या समस्या शासन व प्रशासनामार्फत मार्गी लावण्याचे कार्य सध्या चालू झाले आहे असे दिसत आहे. युवकांनी प्रभागाच्या विकासासाठी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे कामांना अल्पशा प्रमाणात का होईना सुधारणा होत असल्याचे चित्र दिसत आहे नगरपालिकेमार्फत ओम नगर मध्ये खराब झालेल्या रस्त्यांवरती मुरूम टाकण्यात आला व तात्पुरत्या स्वरूपात का होईना पण रस्ता सुरू झाला याबद्दल युवकांनी नगर परिषद सदस्य व नगर परिषद कार्यालय यांचे शतशः आभार मानले. ओम नगरच्या मुख्य चौकातील रस्त्यामध्ये महावितरणच्या कामामुळे मोठे खड्डे पडले होते त्यावरून ये-जा करताना कित्येक मोटरसायकलवाले घसरून पडले युवकांनी थेट कंत्राटदाराला फोन करून हा रस्ता ताबडतोब त्वरित दुरुस्त करून द्यावा अन्यथा संपूर्णपणे काम बंद पाडले जाईल, असे बोलले असता कंत्राटदारांनी दुसऱ्या दिवशी संपूर्ण रस्ता सिमेंट काँक्रिटने भरून दिला त्याबद्दल कंत्राटदाराचे नंतर आभार देखील मानन्यात आले, जवाहर कॉलनी, सुशीला नगर व गणेश नगर मध्ये ही लवकरात लवकर विकास कामे चालू होतील असा विश्वास नागरी कृती समितीचे बाळकृष्ण साळुंके यांनी दिला.वारंवार युवकांनी केलेल्या लाक्षणिक व आक्रमक पावित्र्यामुळे ही कामे मार्गी लागत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. या सर्व कामांसाठी कृष्णा घोलप, शुभम पडवळ, सलमान सय्यद, विनय खारके, शिवाजी सुरवसे, शिवाजी शेटे, खय्युम सय्यद, प्रतिक मगर, सुमित जनराव, नितीश शिंदे या युवकांच्या समवेत ओम नगर नागरी कृती समिती, गणेश नगर नागरी कृती समिती व सुशीला नगर नागरी कृती समिती हे सतत कार्यशील पाठपुरावा करत आहेत.

Related posts