महाराष्ट्र

तणावमुक्त जीवनाचा सवेर्स SAVERS

कष्टकरी कामगार,मजूर शेतमजूर शेतकरी सूर्योदयाच्या पूर्वीच उठत असतो.तसाच शहरात राहणार कामगार,कर्मचारी आणि अधिकारी हा पण सकाळीच उठतो पण सर्वांचा दिनक्रम शौचालयाला जाणे, स्नान करणे जेवणाचा डबा बॅग मध्ये घालून सकाळी मुंबईला जाणारी 6.12 ची सी एस एम टी लोकल पकडणे,तर काही लोक मुंबई वरून कर्जत,कसारा खपोली लोकल पकडून कामांवर जातात मी लोणावळा फॉरबे ला जाण्यासाठी दररोज भांडुपला सकाळी 5.45 ची कर्जत पकडून जायचो कर्जत वरून खपोली, खपोली वरून टाटा सुमो ने फॉरबे लोणावळा परत संध्याकाळी खापोली वरून 6.15 ची मुंबई सी एस टी दोन तीन वर्षे असा प्रवास केला, असाच प्रवास कर्जत,कसारा ते मुंबई लाखो कामगार,कर्मचारी अधिकारी प्रवास करतात. म्हणून कोणी लोकं एकमेकांना भेटले तर प्रथम विचारतात कुठे राहता?. सकाळी किती वाजता उठता?.यांना सकाळची म्हणजे पहाटेची अमर्याद ताकद कधीच कळली नसावी. पहाटेची अमर्याद ताकद काय असते ते आता खाली वाचा.
जगाततील अनेक देशात मोठमोठ्या कंपन्या कामगार,कर्मचारी आणि अधिकारी यांचे मानसिक संतुलन,आरोग्य चांगले राहावे.कामावर असतांना अपघात होऊ नये,काम करतांना कोणतीही चूक होऊन आर्थिक जीवितहानी नुकसान होऊ नये यांची खूप काळजी घेतली जाते.म्हणून दर तीन महिन्याने “तणावमुक्त जीवन” सेमिनार घेतात. त्यात जगप्रसिद्ध व्यावसायीक यशस्वी व्यक्तीची गोष्ट सांगतात. त्याने जीवनात कसा संघर्ष केला. व्यवसायातील अपयश आणि अपघात यावर त्याने जिद्धीने कशी मात केली. पैसा असला की सर्व मित्र नातलग जवळ असतात.संकट आले कर्जबाजारी झाले कि सर्वच सुरक्षित अंतरावर राहतात. यातून बाहेर कसं पडावं, हे त्याला सुचत नाही.तेव्हा एका वैचारिक सल्ला देणाऱ्या मित्रांची गरज असते.तेव्हा वैचारिक मित्रच त्यांना योग्य सल्ला देतो.मित्राने त्याला काही ही सल्ला दिला तर त्यांची अंमलबजावणी आवश्यक असते.तर बदल निश्चितच होतो.प्रत्येक कंपनीत आर्थिक,सामाजिक आरोग्य सल्लागार मास्टर ऑफ सोशल वोर्क (एम एस डब्लू) नियुक्त केले असतात.कामगार ,कर्मचारी आणि अधिकारी कामावर सुरक्षित असलाच पाहिजे पण घरी सुद्धा सुरक्षित असला पाहिजे.तो जर दोन दिवस कामावर आला नाही तर कोणाचे किती नुकसान होईल.याची काळजी घ्यावी लागते.म्हणूनच तणावमुक्त जीवन सवेर्स असावे याची दक्षता घेतली पाहिजे.
मित्रा तु सकाळी लवकर उठ! बाकी सगळं आपोआप होईल या चमत्कारिक सल्ल्याने मित्र निराश होतो. त्याला काहीतरी आगळेवेगळे उपाय अपेक्षित असते,काही दिवस त्याने विचार करण्यात घालविले.पण दिवसेंदिवस निराशा त्याला घेरत होती रात्री झोप येत नव्हती आणि सकाळी जाग येत नव्हती, मग नाईलाज म्हणुन त्याने सकाळी चार वाजता उठायची सुरुवात केली, आणि वैचारिक मित्राने सांगितलेले तु सकाळी लवकर उठ!. त्यांची अंमलबजावणी केली आणि त्याचं आयुष्यच बदलुन गेलं! पहाट आणि सुर्योदय इतके जादुई असतात का?. इतक्या सकाळी उठुन काय करावं? ह्या प्रश्नावर मित्राने एक कोडवर्ड सांगितला. “SAVERS” ह्या आयुष्य बदलुन टाकणार्‍या सहा सवयी आहेत.आपण ही वाचून त्यांचा अनुभव घेऊ शकता.
१) Silence – (ध्यान) शांत बसुन स्वतःच्या आत डोकावणे,म्हणजे ध्यान!. स्वतःच्या आतल्या चेतनेला स्पर्श करणे, म्हणजे ध्यान!. मनाच्या कॉम्पुटरला फॉर्मेट करुन व्हायरस रिमुव्ह करणे म्हणजे ध्यान!. मन प्रफुल्लीत आणि ताजतवानं करण्यासाठी आवश्यक असते ध्यान!. माणसाच्या गरजा किती कमी आहेत, आणि सगळ्या चिंता किती व्यर्थ आहेत याची आत्मप्रचिती म्हणजे ध्यान!. अफाट, अदभुत आणि आनंददायी विश्वशक्ती सोबत स्वतःला जोडून घेणे, आणि स्वतःच्या मन-शरीराचा कणकण प्रफुल्लित करवुन घेण्याची कृती म्हणजे ध्यान!.
२) Affirmations – (सकरात्मक स्वयंसूचना) अफरमेशन्स म्हणजे स्वसंवाद!. स्वतः स्वतःला सुचना देणं, प्रचंड शक्तिशाली असलेल्या अंतर्मनावर आपण निश्चित केलेलं ध्येय कोरणं!. येत्या पाच वर्षात, येत्या एक वर्षात, पुढच्या एका महिन्यात, पुढच्या एका आठवड्यात, आणि आज दिवस भर मी काय काय करणार आहे, याचं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा रिव्हीजन करणे म्हणजे स्वयंसूचना!. स्वयंसुचनांमुळे कल्पना खोल अंतर्मनात झिरपतात,आणि नाटकीयरित्या सत्यातही उतरतात. अंतर्मनाची शक्ती प्रचंड असल्यामुळे तिथे रुजलेला प्रत्येक विचार मग तो चांगला असो की वाईट, खराच होतो.एखादी गोष्ट हजारो वेळा बोलली तर ती अंतर्मनात प्रक्षेपित होते, मग अशुभ कशाला बोलायचे?. वाईट बोलुन विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा, ‘या सुखांनो या’!..म्हणायचे
३) Visualize (चांगल्या कल्पना मनात घोळवणे.) तीव्र इच्छा पुर्ण झाली आहे, अशी मनातून कल्पना करणं, ती पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करणं आणि मनःपटला वर तिला बारीक सारीक रुपात साकारणं, म्हणजे व्हिज्वलायजेशन!. कल्पनाशक्ती ही निसर्गाने माणसाला दिलेली सर्वात अनमोल आणि सर्वात प्रभावशाली भेट आहे. कल्पनाशक्तीचा योग्य वापर केल्यास साधारण माणसाचं यशस्वी व्यक्तीमध्ये रुपांतर होतं. दररोज आपण आपली ध्येयं पूर्ण झाली आहेत, असं मनात घोळवलं पाहीजे. पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदकांची रास उभी करणारा मायकेल फेल्प्स म्हणतो. ज्यावेळी मला झोप येऊ लागते, तेव्हा मला जे नक्की करायचे आहे, ते मनातल्या मनात बघण्याचा मी प्रयत्न करतो. ऑलंपिकविजेती एथलिट लेन बीचले म्हणाली होती, मागचे चार वर्ष मी एकच निकाल डोळ्यापुढे आणत होते, ते म्हणजे, मी हातात विजेतापदक घेऊन उभी आहे, आणि माझ्यावर शॅंपेनचा वर्षाव होत आहे. मायकेस स्मिथ म्हणाला, मी मला हवे असलेल्या स्वप्नाचे रेखाचित्र कागदावर रेखाटतो, स्वप्नांबद्द्ल टिपण लिहतो, आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्याला डोळ्यांसमोर उभे करतो. प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजींना त्यांच्या यशाचे रहस्य विचारले तर ते म्हणाले, “यश दोनदा मिळते, एकदा मनात आणि दुसऱ्यांदा वास्तव जगात!”
४) Exercise (व्यायाम) शरीरातून आळसाला पळवून लावण्यासाठी, शरीरातील उर्जा वाहती ठेवण्यासाठी, मनाने कणखर आणि आनंदी राहण्यासाठी आवश्यक असतो, व्यायाम!. शरीर आळसावलं की मन भ्रष्ट झालंच समजा!. व्यायाम, योगासने, प्राणायाम यांच्या माध्यमातून उर्जेला वळण न दिल्यास ती अतिरिक्त बाबीकडे वळते, आणि माणूस वासनांचा गुलाम बनतो.वाईट सवयींचा गुलाम झालेल्या माणसातले चैतन्य हरपते, अशा व्यक्तीला एकाकी असल्याची जाणीव अस्वस्थ करते. तो कशावरच एकाग्र होवू शकत नाही, आणि म्हणून तो आनंदी होवू शकत नाही, मनात एक अनामिक भय तयार होते. ह्या सगळ्या दुष्ट श्रंखलेला तोडण्याचा एकच उपाय, तो म्हणजे, व्यायाम करा, डिप्स मारा, सूर्यनमस्कार घाला, पुलअप्स करा, ट्रेडमिलवर घाम गाळा,प्राणायाम करा. शरीरातले चैतन्य जिवंत ठेवा.
५) Reading (वाचन) पुस्तकं वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्य जगतात. पुढच्याच ठेस, मागचा शहाणा, ह्या न्यायाने दुसर्‍यांच्या अनुभवाने शहाणे होणारे लोक जगावर राज्य करतात. वॉरेन बफे, बिल गेटस, मार्क जुकरबर्ग हे सगळे आठवड्याला दोन पुस्तके वाचून पूर्ण करतात.
६) Scribing (लिहिणे) लिहिल्याने तुमची तुमच्याशी नव्याने भेट होते. लिहिल्याने मन रिकामे होते, दुःख नाहीसे होते, मनात नव्या उर्जेचा संचार होतो.लिहल्याने नवे रस्ते उघडतात, नव्या प्रगतीच्या वाटा खुलतात.संतानी सांगून ठेवले आहे, दिसामाजी काहीतरी लिहीत जावे.लिहणं, हे सुद्धा स्वसंवादाचं प्रभावी साधन आहे.लिहिल्याने विचार पक्के होतात. सकाळी उठल्यावर आज दिवस भर मी काय करणार आहे, ते लिहावं,एखादी समस्या छळत असेल तर ती लिहून त्याचे उपाय लिहावेत.मनाला स्वप्नांच्या आकाशात मुक्त पणे पाठवून कागदावर स्वप्ने रेखाटावीत.ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी काय काय करणार आहे, त्याचं प्लानिंग, नियोजनही लिहावं, रोज स्वतःला कामे नेमून द्यावीत, आणि पूर्ण झाली की स्वतःला विजयी घोषित करावं. लिहिल्यानं मन मोकळं होतं, चिंतांचं ओझं हलकं हलकं होतं!. जवळच्या व्यक्तीला पत्रं लिहावीत, कधी प्रेरणादायक किस्से कहाण्या लिहाव्यात.अशाने अंतरंग फुलुन येतात, उर्जेचा स्रोत खळखळत वाहतो.ह्या सहा सवयींपैकी प्रत्येक सवय आयुष्य बदलून टाकणारी आहे. वरील सहा सवयींपैकी किती सवयी तुम्ही स्वतःला लावून घेतल्या आहेत?.मी माझात बदल करून घेतला म्हणूनच नियमितपणे वेगवेगळ्या विषयावर संकलन करून लिहत राहतो.
आता आपल्यापैकी प्रत्येकाकडे भरपूर रिकामा वेळ आहे…तो वेळ नकारात्मक पोस्ट वाचून त्यावर चिंतन करण्यात वाया घालवावा की वरील पैकी कोणत्याही एका किंवा जमत असल्यास सर्वच गोष्टी अमलात आणण्यासाठी प्रयत्न करायचा हे सर्वस्वी आपणच ठरवायचे आहे.कोणतीही गोष्ट अंगवळणी पाडण्यासाठी किमान एकवीस दिवसांचा सराव आवश्यक असतो…आणि आपल्याकडे आता कदाचित एकवीस पेक्षा जास्त दिवस रिकामे असणार आहेत.तेव्हा या वेळेचा सदुपयोग करून भावी जीवनासाठी सशक्त मन आणि सशक्त शरीर बनवू शकतो. अशी वेळ व संधी पुन्हा येणार नाही व ती येऊ ही नये.वेळ आहे स्वतःवर काम करण्याची.स्वतःसाठी जगण्याची.आलेल्या परिस्थिती चा फायदा करून घेण्याचा.काळजी घ्यायची आहे,काळजी करायची नाही.कोरोना आला त्याने पाच सहा महिन्यात सर्वांचे आरोग्य,मानसिक आर्थिकदृष्ट्या स्वप्नेच नष्ट करून टाकले.त्यावर मात करण्यासाठी पहाटेची अमर्याद ताकद.समजून घेण्यासाठी तणावमुक्त जीवनाचा सवेर्स SAVERS केला पाहिजे.

सागर रामभाऊ तायडे९९२०४०३८५९.भांडूप मुंबई

Related posts