करमाळा

अतिव्रृष्टीमुळे पिकांचे व घरांचे नुकसानीचे पंचनामे करा – किरण पाटील,सामाजिक कार्यकर्ते.

करमाळा तालुक्यात अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, तसेच खेडेगावांमध्ये घरांची पडझड देखील झाली आहे.
काही ठिकाणी शेतकर्यांची जनावरे दगावली व पाण्यांत वाहून गेली आहेत तसेच शेतकर्यांच्या जमीनी देखील पाण्याखाली गेल्या आहेत.
तसेच ढगफुटी झाल्यामुळें बंधारे,कँनॉल,चार्या फुटल्याने शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. तरी कर्तव्यदक्ष तहसिलदार -समिर माने साहेब यांनी त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश महसुल कर्मचार्यांना देऊन त्वरीत नुकसानग्रस्त शेतकर्यांना व खेडेगावातील घराची पडझड झालेल्या नुकसानग्रस्त कुटुंबांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांनी केली आहे.

Related posts